
देशाच्या प्रगतीसाठी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची गरज
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : देशाच्या प्रगती आणि उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर मार्गक्रमण करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे सचिव राजरत्न आंबेडकर यांनी केले. सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (ता. २८) सिडको भवनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
देशाचे संविधान हे विविधता असलेल्या भारतासारख्या देशातील नागरिकांना एकत्र ठेवण्याचे काम करत आहे. सध्याच्या काळातील नगर नियोजन, मध्यवर्ती बॅंक, ऊर्जा व जल नियोजन या संकल्पनांचे मूळ हे डॉ. आंबेडकर यांनी मांडलेल्या विचारांमध्ये, तसेच त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये असल्याचे राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, व्यवस्थापक फैयाज खान, सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील, सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र हिरे, सरचिटणीस नितीन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी मानवंदना ठरेल, असे मत डॉ. कैलास शिंदे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80533 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..