
आरटीई प्रवेशास १० मे पर्यंत मुदतवाढ
ठाणे, ता. ४ (बातमीदार) : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेकरता निवड झालेल्या बालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी १० मे २०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. बालकांच्या पालकांनी दिलेल्या वेळेत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील १०,४२९ बालकांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी आतापर्यंत ६३६३ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तेव्हा अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या बालकांच्या पालकांनी दिलेल्या मुदत वाढीआधी प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
प्रवेश प्रक्रियेतील निवड झालेल्या बालकांचे प्रवेश घेण्याकरता पालकांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका, पालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करायची आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81082 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..