
कल्याणमध्ये भोंग्यविनाच अजान
कल्याण, ता. ४ (बातमीदार) ः भोंगे उतरविण्यासाठी मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याच्या राज ठाकरेंच्या निर्णयानंतर आज कल्याणात भोंग्याविनाच पहाटेची अजान देण्यात आली; तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कल्याण-डोंबिवली शहरातील प्रमुख चौक, हनुमान मंदिर आणि मशिदीबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला इशारा पाहता कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी आपापल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मशिदींच्या ट्रस्टींची बैठक घेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन आणि जनजागृती केली होती. त्याला प्रतिसाद देत आज पहाटेपासून मशिदींमध्ये भोंग्याविनाच अजान पठण करण्यात आले. पोलिसांच्या आवाहनानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आश्वासन मशिदीच्या ट्रस्टींनी
दिल्याची माहिती महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81107 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..