
मच्छीमारांना सतर्कतेचा इशार
मनोर, ता. ७ ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या १९ तारखेपासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी आणि वीट उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आखण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चालू हंगामात दुबार भातशेतीची कापणी तर भुईमूग, भाजीपाला, आंबा आणि काजूची काढणी शिल्लक आहे. वादळी वारे आणि पावसामुळे तयार पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना आखण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
कापणीसाठी तयार झालेल्या उन्हाळी भातपिकाच्या शेतातील पाण्याचा निचरा करून भाताची कापणी करून मे महिन्याच्या १५ तारखेपूर्वी काढणी करावी. त्यानंतरच्या दोन दिवसांत वाळवणी व झोडणी करून भाताची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81467 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..