
पाण्याच्या टाकीला गळती
कोपरखैरणे, ता. ९ : घणसोली रेल्वेस्थानकामधील प्रवासी जिन्याखालील पिण्याच्या पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे. त्यामुळे हा परिसर ओला झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना जिन्याखालून जीव मुठीत घेऊन चालावे लागते. प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करूनही या गंभीर गोष्टीकडे कानाडोळा होत आहे. एखाद्या प्रवाशाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल प्रवासी वर्गाकडून होत आहे.
घणसोली स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जिन्याखालील पाण्याच्या टाकीला गळती लागली असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. नवी मुंबईची सुनियोजित शहर अशी ओळख आहे. मात्र रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. स्थानकाच्या डागडुजीकडे पाहण्यास कुणालाही वेळ नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असे रेल्वे प्रवासी सुशांत कुलकर्णी यांनी म्हटले. यासंदर्भात रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांना विचारले असता सदर भागाची पाहणी करून समस्या सोडवण्यात येईल, असे सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81634 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..