
बेशिस्त आठवडी बाजारामुळे कांदिवलीत वाहतूक कोंडी
कांदिवली, ता. १० (बातमीदार) ः पूर्वेकडील मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असलेल्या हनुमाननगर येथील मुख्य रस्त्यावर सोमवारचा आठवडी बाजार भरतो. या अरुंद मार्गावरील बाजारामुळे स्थानिक प्रवासी आणि वाहनचालकांची कोंडी होत आहे.
प्रत्येक सोमवारी रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या समस्याकडे पालिका आर/दक्षिण कार्यालयातील अतिक्रमण व निष्कासन विभागाने लक्ष देऊन बाजारावर कारवाई करावी; अन्यथा शिस्त लावावी, अशी मागणी हनुमाननगरांतील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर सोमवारी मालवणी, कुर्ला, वांद्रे आणि दहिसर येथून फेरीवाले येतात. यामुळे रस्त्याच्या एका बाजूला फेरीवाल्यांकडून; तर दुसऱ्या बाजूला दुकानदारांकडून रस्ता अडवला जातो. यामुळे वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठी दुचाकीस्वारांनाही जागा नसते. एवढी भयानक परिस्थिती सोमवारच्या बाजारातील अनधिकृत फेरीवाल्यांनी निर्माण केली आहे. हनुमाननगर येलो गेट ते शंकर मंदिर एसआरए इमारतीपर्यंच्या रस्त्यावर हातगाड्या, लोखंडी, लाकडी बाकडे आणि जमिनीवर बसून फेरीवाले जागा अडवतात. यामुळे रस्त्यावरून महिला, वयोवृद्ध आणि लहान मुले यांना जीव मुठीत धरून जावे लागत लागत आहे. बाजाराबाबत पालिका आणि पोलिसांना तक्रार देऊनसुद्धा काहीच कारवाई होत नाही, असे मनसे उपविभाग अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.
...
कारवाईचे आश्वासन
‘मी स्वतः हा समस्या पाहून घेतो आणि योग्य ती कारवाई करतो,’ असे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे निरीक्षक सय्यद एस. आय. यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81698 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..