
तब्बल ५० वर्षांनी भेटले माजी विद्यार्थी
पालघर, ता. ११ (बातमीदार) ः केळवे येथील आदर्श विद्या मंदिर या शाळेतील १९७२ वर्षांमध्ये आठवीत असलेले विद्यार्थी तब्बल ५० वर्षानंतर पुन्हा शाळेत भेटले. तब्बल ५० वर्षांनंतर या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मैत्रीला पुन्हा उजाळा दिला.
माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याला वेगवेगळ्या क्षेत्रात कामे करून सेवानिवृत्त झालेले, तसेच काही स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करणारी मित्र मंडळी एकत्र आली. या मेळाव्याला माजी शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांची संवाद साधून आपल्या आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे बदलापूर, ठाणे, मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरून हे सर्व माजी विद्यार्थी केळवे येथे एकत्रित आले होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सुनील फेंगडे यांनी आभार मानले. या सर्व माजी विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था राजेंद्र पाटील यांनी केली होती. माजी मुख्याध्यापक हरिहर पाटील, कमलाकर म्हात्रे ,धोंडू पेडणेकर उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81813 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..