
आदिवासींचे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न
पालघर, ता. १० (बातमीदार) ः आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे प्राधान्य आहे, असे मत आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी व्यक्त केले.
पाडवी सोमवारी (ता. ९) पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. पाडवी म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्यासाठी आदिवासी समाज संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून ते प्रश्न सोडवू. गेल्या दोन वर्षांपासून आदिवासी सल्लागार मंडळाची बैठक झालेली नाही. मे महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन केले जाईल. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, आमदार राजेश पाटील, काँग्रेसचे सहसंपर्क प्रमुख यशवंत सिंग ठाकूर आदी उपस्थित होते.
आदिवासींमधून अधिकारी तयार व्हावेत
नागालँड, मिझोराम आदी राज्यातील आदिवासींमधून सनदी अधिकारी निर्माण केले जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आदिवासींच्या विद्यार्थ्यांमधून सनदी अधिकारी तयार व्हावे, यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्न करील, वेगवेगळ्या योजना आखेल, असे आश्वासन पाडवी यांनी दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81818 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..