
राणांनी राजकीय फायद्यासाठी जातीचा वापर थांबवावा!
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी मागास जातीची ढाल पुढे करून समाजाला बदनाम करण्याचे काम थांबवावे, असे आवाहन मातंग समाजाचे नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केले आहे.
यासंदर्भात बोलताना सुरेशचंद्र राजहंस पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरून वातावरण बिघडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या धर्माचे पूजा-पाठ, प्रार्थना करण्याचा अधिकार संविधानाने सर्वांना दिला आहे, पण त्यासाठी दुसऱ्यांना त्रास देण्याची गरज नाही. याप्रकरणी नवनीत राणा यांना अटक केली असता कोठडीत त्यांना मागास जातीची असल्याने पाणी पिण्यास दिले नाही, अशी तक्रार लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली होती आणि आता जामिनावर सुटका होताच पुन्हा लोकसभा अध्यक्षांना भेटून त्यांनी तक्रार केली आहे. नवनीत राणा या महाराष्ट्र पोलिस व महाराष्ट्राची, देशात बदनामी करत आहेत. राणा यांनी जातीचा आधार घेऊन स्वतःचे राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करू नये, तसेच त्यांनी दलित समाजाचे नाव खराब करू नये.
...
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81884 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..