
पालिकेच्या कामामुळे जीवितहानीची शक्यता
धारावी, ता. ११ (बातमीदार) : येथील संत रोहिदास मार्गावरील काळा किल्ला या ठिकाणी मुंबई महापालिकेतर्फे पर्जन्य वाहिनीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही सुरक्षा यंत्रणा व सुरक्षारक्षक नसल्यामुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कामासाठी ठेवलेल्या मोठ्या जलवाहिनीवर लहान मुले खेळत असतात. यामुळे मुलांना दुखापत किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी सुरक्षा कुंपण व सुरक्षा रक्षक ठेवण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे मुंबई सचिव मणी बालन यांनी एका लेखी निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे. येथील चामड्याच्या वस्तू विक्रेते राम कोकणे यांनी सांगितले की, इथे लहान मुले खेळत असतात. आम्ही त्यांना हुसकावून लावतो. मात्र आम्ही आमच्या कामात व्यग्र असल्याने सतत मुलांवर लक्ष देऊ शकत नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81886 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..