
कुसापूरमधून जलशक्ती अभियानाला सुरुवात
वज्रेश्वरी, ता. ११ (बातमीदार) ः जलशक्ती अभियान मोहीम अंतर्गत मौजे कुसापूर ग्रामपंचायत येथे लोकसहभागातून जलस्रोतांची दुरुस्ती करणे, गाळ काढणे आदी कामांचा शुभारंभ भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. लोक सहभागातून नदीतील गाळ काढून त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेत जमिनीत वापर करून जमिनीची सुपीकता, उत्पादकता वाढवावी, असे आवाहन आमदार मोरे यांनी केले. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसहभागातून अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांचे दुरुस्ती, नाला खोलीकरण व रुंदीकरण करणे, नदी-गावतलाव-नाला यांतील गाळ काढणे, वनराई बंधारा जागा निश्चितीकरण करणे, तसेच विविध मशागती पद्धती जसे उताराला आडवी नांगरणी-पेरणी, समतल मशागत, धूप प्रतिबंधक पिके यांची लागवड करणे अशा उपक्रमाचे समावेश आहे, असे तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81906 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..