
या मुलांचे पालक कोण?
मानखुर्द, ता. १२ (बातमीदार) ः वांद्रे (पश्चिम) येथील कमिटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये गौरी कुंभार (वय ८), रेहान शेख (वय ११), रजिया कुरेशी (वय ८), प्रियांशू राजकुमार (वय ८), गंगोत्री गोरखा (वय ९), पार्वती राय (वय १२ ) आणि बिलाल अन्सारी (वय ८) ही मुले देखरेखीखाली वास्तव्यास आहेत. बाल कल्याण समितीच्या आदेशाने या सर्व मुलांना वांद्रे येथील कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे पाठवण्यात आले होते. या सर्व मुलांना कुटुंबांबद्दल किंवा त्यांच्या घराविषयी माहिती सांगता आली नव्हती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेता आला नाही. या मुलांच्या पालकांनी, कुटुंबीयांनी तत्काळ कमिटेड कम्युनिटी ट्रस्ट (आश्रय) वांद्रे (पश्चिम) मुंबई ५० किंवा ९८७०३५९९२२, ९९३०३७७५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा बाल कल्याण समिती, बाल संरक्षण समिती मुंबई उपनगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81997 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..