
रस्त्याची दुरुस्ती पूर्ण कधी होणार?
धारावी, ता. १२ (बातमीदार) : धारावी मुख्य रस्त्यावरून पश्चिम द्रुतगती मार्गावरील ‘टी’ जंक्शन येथे जाण्यासाठी रजबली चाळ येथून जवळचा रस्ता आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी रस्त्यावरील जुने पेव्हर ब्लॉक काढून टाकण्यात आले आहेत. यामुळे पादचाऱ्यांना पायवाटेवरून चालणे मुश्कील झाले आहे. तसेच दुचाकी व चारचाकी वाहने नेणे कठीण झाले आहे. या परिसरात अनेक छोटे-मोठे उद्योग चालतात. त्यांचे साहित्य नेण्या-आणण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. पण रस्त्याचे काम अर्धवट असल्याने स्थानिक रहिवासी, पादचारी व व्यापारी संताप व्यक्त करत आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीमुळे जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये अनेकदा पादचारी व बाईकस्वार घसरून पडण्याच्या घडत आहेत. लवकरात लवकर रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81998 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..