
सायवन भावरपड्यात पाणीटंचाई
कासा, ता. १२ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील सायवन ग्रामपंचायत हद्दीतील भावरपाडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. सायवन हे डोंगर-दऱ्यातील गाव असून येथील भावर पाड्यात पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात असून नियोजनाच्या अभावामुळे सध्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
येथील बोअरिंग नादुरुस्त असून विहिरींनी तळ गाठला असून हंडाभर पाण्यासाठी महिला, लहान मुले विहिरीवर तासनतास थांबत आहेत.
या बाबतीत सायवन ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी एम. बी. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सायवनमधील हा भाग उंचावर आहे. त्यामुळे मे अखेर येथे पाणी कमी होते. त्यामुळे दरवर्षी टँकरच्या साह्याने विहिरीत पाणी सोडण्यात येते. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली जाईल.
या भागात असणाऱ्या बोअरिंग नादुरुस्त झाल्याने आणि विहिरीने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी खूप त्रास घ्यावा लागत आहे. विहिरीत पाणी साठण्यासाठी खूप वेळ जातो, त्यामुळे काम टाकून पाण्यासाठी येथे थांबावे लागत आहे.
- गीता भावर, महिला
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82042 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..