
भिवंडीत पाणीटंचाईचा झळा
भिवंडी, ता. १२ (बातमीदार) ः उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेला आहे. अशातच भिवंडी महापालिका प्रशासनाकडून शहरात सुरळीत पाणीपुरवठा केला जात नसल्याने शहराला पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याचा आरोप केला जात आहे. पाणीटंचाईबाबत महापालिका आयुक्त, प्रशासन व पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करूनसुद्धा दुर्लक्ष केले जात असल्यामुळे भिवंडी शहरातील ब्रह्मानंदनगर भागातील नगरसेवक नीलेश चौधरी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिका प्रशासनाने आदिवासी पाडा, हनुमाननगर, नवीन ताडाळी, राजीव गांधी नगर, अंजूरफाटा या परिसरात सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास २० मे रोजी निषेध मोर्चा काढण्याचा इशारा चौधरी यांनी दिला आहे. यासंदर्भात चौधरी यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख व महापौर यांना गुरुवारी लेखी निवेदन दिले आहे.
पाण्यासाठी महिलांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी दूषित पाणी मिळत असल्याने आजाराचा धोकादेखील वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही, तर मोर्चा काढण्यात येईल, असे नगरसेवक नीलेश चौधरी यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82048 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..