
सरकारने सूडभावनेने कल्याण रेल्वे यार्डचा प्रकल्प रखडवला
कल्याण, ता. १२ (बातमीदार) ः कल्याण स्टेशन पुनर्विकास आणि कल्याण रेल्वे यार्डच्या विकासाच्या प्रकल्पांकडे ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. याबाबत ठाकरे सरकार सूडभावनेने वागत आहे, असा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे.
राज्य सरकारच्या अखत्यारित असणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी)साठी आपल्या वाट्याचा तब्बल १००० कोटींचा निधी गोठवला. त्यामुळे कल्याण यार्डाचा पुनर्विकास, एसी लोकलची खरेदी, सिबीटीसी सिग्नल प्रणाली व अशा सर्व विकासकामांचा वेग थंडावला असल्याचा आरोप पवार यांनी केला. या सर्व विकासकामांमुळे कल्याण स्टेशनचा पुनर्विकास झाला असता व लाखो प्रवाशांच्या रोजच्या हालअपेष्टा थांबल्या असत्या, असे ते म्हणाले.
शहराच्या उपनगरीय नेटवर्क क्षमतेचा विस्तार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) हा महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा ५०:५० चा संयुक्त उपक्रम आहे. प्रकल्पाचा खर्च दोघांनी सारखाच उचलावा, असे अपेक्षित आहे. राज्य सरकारने २०२० पासून आपला निधी जारी केला नाही आणि एमआरव्हीसीचे सुमारे १,००० कोटी रुपये थकीत आहेत. ही कमतरता रेल्वे मंत्रालयाने भरून काढली आहे; परंतु राज्य सरकारने त्यांच्या वाट्याचा निधी उपलब्ध केला नाही, असा आरोप पवार यांनी केला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82137 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..