
बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू
कर्जत, ता. २० (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या टाकाची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका बैलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत बैलाच्या मालकांनी आपल्याला आर्थिक नुकसानीची भरपाई वन विभागाने मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे.
कर्जत तालुक्यात असलेल्या भडवळ टाकाचीवाडी येथील हिरू धर्मा शिंगवा या आदिवासी शेतकऱ्याचा बैल जंगल परिसरात गेला होता. दरम्यान, दबा धरून बसलेल्या बिबट्याने बैलावर झडप घालून त्याला ठार केले. बैल घरी आला नाही म्हणून शिंगवा यांनी जंगल परिसरात शोधाशोध केली असता तो बैल मृत झाला होता. मृत बैलाची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सलगर यांनी तपासणी केली असता हा हल्ला बिबट्याने केला असल्याचे समोर आले आहे.
आर्थिक मदतीची मागणी
माथेरान वन क्षेत्रातील नेरळ वन परिघाचे वनपाल एस. एच. म्हात्रे यांनी संबंधित जनावरांचे मालक हिरू धर्मा शिंगवा यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82970 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..