
रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी बुधवारपासून आंदोलन
कल्याण, ता. २९ (बातमीदार) ः नवीन रिक्षा परवाने वाटप बंद, रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन, दंडामध्ये झालेली भरमसाठ वाढ कमी करावी, आदी मागण्यांसाठी बुधवारपासून (ता. १ जुलै) आंदोलन करण्याचा इसारा रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोसिएशन अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी दिला आहे.
रिक्षा टॅक्सी चालक-मालक असोसिएशनच्या पदाधिकारी स्टॅण्ड प्रमुख, उपस्टॅण्ड प्रमुख, कार्यकर्ते यांची सर्वसाधारण सभा कल्याणमध्ये नुकतीच पार पडली. या सभेत रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
रिक्षाचालकांसाठी केरळ, तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, सीएनजी, इंधन दरवाढ, पेट्रोल डिझेल दरवाढीप्रमाणे भाडे वाढ करावी, ई-चलन दंडात्मक कारवाईत त्रुटी आहेत त्या दूर कराव्यात, आदी मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. रिक्षाचालंकाचे प्रश्न सोडविले नाही तर १ जुलैपासून कोकण विभागात रिक्षाचालकांचे तीव्र आदोलन छेडले जाईल, अशी घोषणा अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83926 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..