
बहुतांश घरमालकांना अग्निसुरक्षेची माहिती नाही
बहुतांश घरमालकांना अग्निसुरक्षेची माहिती नाही
गोदरेज सिक्युरिटी सोल्युशनचा अहवाल
सकाळ वृत्तसंस्था
मुंबई, ता. ५ ः देशातील निवासी आणि व्यावसायिक वापराच्या जागांच्या आगीपासूनच्या सुरक्षेबाबतची सर्वच माहिती सर्वच लोकांना नसते, असा निष्कर्ष गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सच्या अहवालात नोंदविण्यात आला आहे.
जागांचा वापर करणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील सवयींबाबत संशोधन करून हा अहवाल तयार केला आहे. देशभरातील सात प्रमुख शहरांमधील २१०० पेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागातून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. आगीबाबत सुरक्षिततेच्या संदर्भात जागरूकता वाढावी आणि लोकांच्या दृष्टिकोनात बदल व्हावेत, हा यामागील हेतू होता.
कामाच्या ठिकाणी फायर अलार्म वाजू लागल्यास सर्वात जवळचा आपत्कालीन दरवाजा (फायर एक्झिट) कोणता याची माहिती फक्त ४४ टक्के व्यक्तींना आहे; तर ५५ टक्के लोकांना याबाबत काही माहिती नाही. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ५८ टक्के व्यक्तींना त्यांची घरे आगीपासून सुरक्षित आहेत की नाही, याची खात्री नाही; तर ४१ टक्के व्यक्तींना याबाबत पक्की खात्री असल्याचे दिसून आले आहे.
इमारतींमध्ये अग्निसुरक्षेबाबत उपाययोजना असणे महत्त्वाचे आहे. ही जागरूकता लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे. ही जागरूकता किती आहे, हे समजून घेणे हा सर्वेक्षणाचा प्राथमिक हेतू होता. सध्याच्या कमतरतांविषयी तपशीलवार माहिती मिळवणे आणि सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणे महत्त्वाचे असल्याचे दाखवणे, हादेखील हेतू होता.
- पुष्कर गोखले, बिझनेस हेड, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84755 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..