
शाळेच्या पहिल्या दिवसावर निबंध स्पर्धा
पनवेल, ता. १४ (प्रतिनिधी) : कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शैक्षणिक वर्ष आता सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाईन निबंध स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्हीपैकी कोणत्याही भाषेत सहभाग घेता येणार आहे. इयत्ता ८ वी ते १० वी गटासाठी १ हजार ते १५००, तर इयत्ता ५ वी ते ७ वी या छोट्या गटासाठी ५०० ते ७०० शब्दांची मर्यादा असणार आहे. ‘सुट्टीमध्ये मी घालवलेला अविस्मरणीय दिवस’, ‘ओढ शाळेच्या पहिल्या दिवसाची’, ‘हो! मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय’ या तीन विषयांवर निबंध पाठविण्याची अंतिम तारीख २० जून २०२२ आहे. सर्व स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. निबंध ९९२०७६५७६५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85676 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..