
वाशी गावात तरुणाची आत्महत्या
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : वाशी गावात राहणाऱ्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. १) दुपारी घडली. अतिश हरिचंद्र पाटील (वय २७) असे या तरुणाचे नाव असून त्याच्या आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट आहे, पण प्रेम प्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार वाशी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
मृत अतीश हरिचंद्र पाटील हा वाशी गावात आपल्या कुटुंबासह राहत होता. काही वर्षांपूर्वी अतीशचे आई-वडील वारल्याने सध्या तो एकटाच राहत होता. शुक्रवारी दुपारी अतीश हा आपल्या घरात असताना त्याने पंख्याच्या हुकला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास अतीशचे काका दिलीप पाटील हे अतीशला बघण्यासाठी त्याच्या घरात गेले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी अतीशला तात्काळ खाली उतरवून एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अतीशने मृत्युपुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असली, तरी त्यात त्याने कुणाचा उल्लेख केलेला नाही. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87596 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..