
खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
शिवडी, ता. ९ (बातमीदार) ः विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागाच्या वतीने खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता ‘रशिया-युक्रेन युद्धाचे जागतिक परिणाम आणि भारताची भूमिका’, ‘भारताचे नवीन शैक्षणिक धोरण देशातील शिक्षणाची स्थिती बदलेल का?’, ‘वृत्तवाहिन्यांची अनोळखी सूत्रं’, ‘लॉकडाऊनमुळे बदललेली उद्योग क्षेत्रं’, ‘वाढते तापमान’, ‘पर्यावरणासाठी आव्हान’ हे निबंधाचे विषय आहेत. निबंधाची शब्दमर्यादा एक हजार ५०० शब्द इतकी आहे. वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपले विचार निबंध रूपाने लिहून त्यावर आपले नाव पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा, तसेच आपला निबंध टंकलिखित किंवा स्वच्छ अक्षरात लिहून त्याची स्कॅन कॉपी पीडीएफ स्वरूपात संस्थेच्या कार्यालयीन पत्त्यावर किंवा vumm 1954@Gmail.com या ईमेल आयडीवर १३ जुलैपूर्वी पाठवावेत. ई-मेलमधील विषयात खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा असे नमूद करावे. अधिक माहितीसाठी शिक्षण प्रमुख विशाल पोळ किंवा सहायक शिक्षणप्रमुख साहिल पाटील यांना संपर्क साधावा.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88352 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..