Wed, August 10, 2022

मुंबईच्या उपनगरांना दूषित पाण्याचा पुरवठा
मुंबईच्या उपनगरांना दूषित पाण्याचा पुरवठा
Published on : 17 July 2022, 11:20 am
चेंबूर, ता. १७ (बातमीदार) ः उपनगरातील चेंबूर, चुनाभट्टी, नेहरूनगर, कुर्ला, विक्रोळी व भांडुप परिसरात कित्येक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे साथीचे आजार बळावण्याचा धोका वाढल्याने स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
चेंबूर, चुनाभट्टी, नेहरूनगर, टिळकनगर, कुर्ला व विक्रोळी परिसराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आणि इमारतीचे बांधकाम होत असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे; पण लोकसंख्येनुसार पाण्याचा पुरवठा होत नसतानाच आता गढूळ पाणी येत असल्याने डेंगी, मलेरिया, कावीळसारखे आजार बळावण्याची भीती आहे. त्यामुळे १५० ते २०० रुपये मोजून स्वच्छ पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89306 Txt Mumbai
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..