
कांदिवली उड्डाणपुलावर धोका
कांदिवली, ता. १९ (बातमीदार) ः कांदिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलाच्या दुभाजकावरील सुरक्षिततेसाठी लावलेल्या लोखंडी जाळ्या गायब झाल्या आहेत. सहा महिने उलटूनही अद्याप या जाळ्या बसविण्यात आल्या नसल्याने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांमुळे अपघाताचा धोका आहे.
कांदिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या उड्डाणपुलाचा मार्ग उताराचा आणि वळणदार असल्याने अनेकदा रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिकेने या पुलावर संरक्षक जाळ्या बसविल्या आहेत; पण काही ठिकाणी या लोखंडी जाळ्या वाकविण्यात आल्या आहेत; तर काही ठिकाणी तुटल्या असल्याने पालिकेच्या वतीने त्या काढण्यात आल्या आहेत. तब्बल तीन ठिकाणी सुरक्षिततेसाठी असलेल्या लोखंडी जाळ्या नाहीत. पावसाळ्यात पाणी वाहत असल्याने उताराच्या आणि वळणदार मार्गावर दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात तरी संरक्षित जाळ्या लावाव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
-------------------------
पार्वतीबाई प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने चार महिन्यांपूर्वी पालिकेकडे याबाबत तक्रार केली आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असून पावसाळ्यात या मार्गावर अपघातांचा धोका वाढला आहे.
- मनोज गिरीधर, सामाजिक कार्यकर्ते
-----------
कांदिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलावर जाळ्या बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी असल्याने कामासाठी विलंब होत आहे.
- सुनील बेंद्रे, कार्यकारी अभियंता
फोटो आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89535 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..