
शिंदे गट लिहून घेतोय प्रतिज्ञापत्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ ः शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची, हा वाद न्यायालय आणि त्यांच्या पक्षातही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाण्यातील समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहेत. टेंभी नाका येथील आनंद मठात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले.
शिवसेनेवर पक्षीय वर्चस्व दाखवण्याच्या हेतूने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तसेच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चढाओढ लागली आहे. याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहेत; तर ठाण्यातील शिंदे समर्थकांकडूनही शुक्रवारी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेस बरोबर केलेली आघाडी चुकीची होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या वेगळ्या गटाला आमचा पाठिंबा आहे, असे या प्रतिज्ञापत्रात लिहून घेतले जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90723 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..