महाराष्ट्राचे अरण्यऋषी

महाराष्ट्राचे अरण्यऋषी

रंग मराठीचे

महाराष्ट्राचे अरण्यऋषी

पर्यावरण संवर्धन, हरितक्रांतीसारख्या विषयांवर आज सहज चर्चा होत असली तरी आयुष्यातील ६०-६५ वर्षे जंगलात राहून पशू-पक्ष्यांचा अभ्यास, त्यांच्या दिनचर्येचे निरीक्षण आणि ओघवत्या भाषेत त्यावर लिखाण करणारे मारुती चितमपल्ली हे एकमेवच. वन विभागात नोकरी करताना त्यांनी जंगल आत्मियतेने समजून घेतले आणि सोप्या, बोली भाषेत शब्दबद्ध केले. म्हणूनच ‘अरण्यऋषी’ म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
सोलापुरात १९३२ मध्ये तेलुगू कुटुंबात जन्म होऊनही चितमपल्ली यांचे शिक्षण मराठीत झाले. बालपण गुजराती, मुस्लिमबहुल वस्तीत गेल्याने तेलुगू, मराठी, गुजराती, उर्दूमिश्रित हिंदी भाषेवर त्यांची उत्तम पकड होती. याशिवाय जर्मन, रशियन भाषेचा त्यांनी अभ्यास केला. प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करताना अडचण येऊ नये म्हणून वयाची ऐंशी ओलांडल्यावरही ते हिरीरीने संस्कृत भाषा शिकले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत चितमपल्ली यांनी काम केले असले तरी ते मनापासून रमले भंडारा जिल्ह्यातील नवेगाव बांध पक्षी अभयारण्यात. वनभ्रमंतीबरोबरच अध्ययन, लेखन हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. पक्षिकोश, सुवर्णगरूड, आनंददायी बगळे, पाखरमाया, पक्षी जाय दिगंतरा, चकवाचांदणं, आपल्या भारतातील साप, केशराचा पाऊस इत्यादी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आलेले चितमपल्ली यांनी २००६ मध्ये मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. जंगलाचं देणं, रानवाटा, रातवा या त्यांच्या पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
- पद्मजा जांगडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com