प्रवाशांच्या सुरक्षेत हलगर्जी नको

प्रवाशांच्या सुरक्षेत हलगर्जी नको

मुंबई, ता. १४ : बेस्ट बसला आग लागल्याची घटना नुकतीच वांद्रे येथे घडली होती. वारंवार घडणाऱ्या घटनांची दखल घेत बेस्ट प्रशासनाने याप्रकरणी आयोजित बैठकीत कंत्राटदारांची झाडाझडती घेतली. आगीची घटना घडल्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवशी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली होती. प्रवाशांच्या सुरक्षेत कोणतीही हलगर्जी नको, असेही चंद्र यांनी बजावले.

बेस्ट उपक्रमाची ५१ क्रमांकाची बस वांद्रे एसव्ही रोड जंक्शन येथे आल्यानंतर तिला आग लागली होती. गिअर बॉक्समध्ये स्पार्क होऊन बसने पेट घेतला होता. अशीच आगीची घटना दिल्लीतही काही दिवसांपूर्वी घडली होती. दिल्ली आणि मुंबईत एकाच कंत्राटदाराकडून पुरवण्यात आलेल्या बसेसमध्ये असा प्रकार निदर्शनास आला होता. वांद्रे येथील घटनेत बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते; परंतु बस वाहकाच्या प्रसंगावधानामुळे हे प्रवासी वेळीच खाली उतरवण्यात आले. याआधी वांद्रे एसव्ही रोड जंक्शन येथेही मातेश्वरी कंपनीची एक बस जळाल्याचा प्रकार समोर आला होता. पंधरा दिवसांत अशा दोन बस आगीने जळण्याच्या घटना समोर आल्याने महाव्यवस्थापकांनी कंत्राटदाराची झाडाझडती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com