विक्रमगड तहसील कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा

विक्रमगड तहसील कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा

विक्रमगड, ता. १७ (बातमीदार) : नगरपंचायतीमार्फत प्रारूप विकास योजना आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा आराखडा रद्द करून त्याबाबत जनसुनावणी घ्यावी, या मागणीसाठी विक्रमगड बचाव सर्वपक्षीय स्व-हक्क कृती समितीमार्फत तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गावातील ९० टक्के अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहे. ३०, ४० व ५० मीटर रुंदीचे सुमारे ६५ रस्ते खरीप जमिनीतून टाकल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. गावातील छोटी-मोठी दुकाने व राहती घरे उद्‍ध्‍वस्त होत असल्याने अनेकांना बेघर व बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे; तरी सदर प्रारूप आराखडा रद्द करावा, अशी मागणी स्व-हक्क कृती समितीने जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे केली आहे. तसेच प्रारूप विकास योजना आराखडासंदर्भात नागरिकांनी हरकती व आक्षेप घेतले आहेत, त्याची सुनावणी २० फेब्रुवारीपासून नगरपंचायत येथे न घेता शासकीय स्तरावरून सुनावणी घ्यावी, अशी मागणी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेकऱ्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com