कोळंबी प्रकल्पामुळे भात शेती धोक्यात

कोळंबी प्रकल्पामुळे भात शेती धोक्यात

बोर्डी, ता. २२ (बातमीदार) : डहाणूपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आगर ग्रामपंचायत क्षेत्रानजीक कोळंबी प्रकल्पामुळे भातशेतीमध्ये खारे पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेकडो एकर जमीन नापीक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासनाने कोळंबी प्रकल्पांना मंजुरी देताना परिसरातील भातशेती नापीक होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी भंडारी समाजातील सामाजिक कार्यकर्ते भगवान कडू यांनी केली आहे. आगर ग्रामपंचायत क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या खाजण जमिनीत खाजगी कोळंबी प्रकल्पाला शेकडो एकर जमीन शासनातर्फे देण्यात आली आहे. या कोळंबी प्रकल्पामुळे समुद्राच्या भरतीच्या खाऱ्या पाण्याचा पसारा परिसरात असलेल्या शेतजमिनीत वाढणार असल्यामुळे या भागातील शेतीमध्ये पावसाळी भातशेती करणे शेतकऱ्यांना कठीण होणार आहे. या भागात सर्व्हे नंबर १४० मध्ये अनेक आदिवासी व भंडारी समाजातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची भातशेती जमीन असून पूर्वपरंपार पावसाळी भातशेती केली जात आहे; मात्र शासनाच्या धोरणाप्रमाणे खाजण जमिनीत कोळंबी प्रकल्पाला मान्यता देण्यात येत असल्यामुळे शेतजमिनी नापीक होत आहेत. शासनाने कोळंबी प्रकल्पाची जमीन देताना परिसरातील शेतकऱ्यांच्या भवितव्याचादेखील विचार करण्याची गरज असल्याची मत भगवान कडू यांनी व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com