ईडीचे बोगस समन्स पाठवून पैशांची मागणी

ईडीचे बोगस समन्स पाठवून पैशांची मागणी

भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : विकसकाच्या नावे ईडीचे (अंमलबजावणी संचालनालय) बनावट समन्स तयार करून ते समाजमाध्यमांवर पसरवून पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून तीन जणांवर काशी मिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे सांगण्यात आले.

सालासर बिल्डरचे आनंद अगरवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार काशी मिरा भागात शत्रू मालमत्ता विकसित करण्यासाठी घेतली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी मितेश शहा याने शत्रू मालमत्तेसंदर्भात ईडी कार्यालयाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली असल्याचे सांगून अगरवाल यांना समन्स दाखवले होते. ईडी कार्यालयात ओळख असल्याने हे प्रकरण मिटवू, त्यासाठी या प्रकरणातील गौतम अगरवाल याला साडेसहा कोटी रुपये द्यावे लागतील आणि ईडी प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे शहा याने त्यांना सांगितले. राजू शहा याने बनावट समन्स समाजमाध्यमांवर पसरवून बदनामी केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

असा झाला खुलासा...
समन्सबद्दल संशय आल्याने आनंद अगरवाल यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाला ई-मेल पाठवत समन्सबद्दल चौकशी केली. त्यावर ईडी कार्यालयाकडून कोणतेही समन्स बजावण्यात आलेले नाही, ईडी स्वत: या प्रकरणाची चौकशी करेल, असे आनंद अगरवाल यांना सांगण्यात आले. त्यानंतर आनंद अगरवाल यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी समन्ससंदर्भात पडताळणी केल्यानंतर मितेश शहा, गौतम अगरवाल आणि राजू शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com