नवी मुंबईकरांची पाणीकपातीतून सुटका

नवी मुंबईकरांची पाणीकपातीतून सुटका

वाशी, ता. १४ (बातमीदार) ः कडक उन्हाळा सुरू झाला असल्याने राज्यात काही ठिकाणी पाणीकपातीचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेण्यात आला आहे, पण नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात १७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पाणीकपातीचा निर्णय अद्याप तरी झाला नसल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबई महापालिका हद्दीतील रहिवाशांना मोरबे धरणातून दैनंदिन ४४० एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो. अशातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ८८ मीटर आहे; तर १४ मार्चपर्यंत धरणात ७७.७३ मीटरपर्यंत पाण्याची पातळी असल्याने सद्यस्थितीत ७०.२९६ एमसीएम इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे १७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
-------------------------------------------
पनवेलमध्ये टॅंकरची वारी
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मोरबे धरणात ५२.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा किमान १७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका असल्याने नवी मुंबईकरांची तहान भागणार आहे. अशातच नवी मुंबई शहराला लागून असलेल्या पनवेल शहरात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
---------------------------------------------
धरणाची सध्यस्थिती ः
एकूण साठवणक्षमता - ८८ मीटर
सध्याची पातळी - ७७.४३ मीटर
शिल्लक पाणीसाठा - ७०.२९६ एमसीएम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com