भूमिहीन शेतकऱ्यांसाठी जलसमाधी घेणार

भूमिहीन शेतकऱ्यांसाठी जलसमाधी घेणार

पेण, ता. १४ (वार्ताहर) : राज्यातील भूमिहीन शेतकऱ्यांसाठी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना व बिरसा मुंडा सबलीकरण स्वाभिमान योजना याअंतर्गत समाजातील वंचित घटकांसाठी मोफत जमिनींचे वाटप करायचे आहे. याबाबत सरकारला वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासन याकडे कानाडोळा‍ करत आहे. प्रशासनाच्या या नाकर्ते धोरणामुळे २० मार्चला महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सावित्री नदीपात्रात माझ्यासह अनेक कार्यकर्ते जलसमाधी घेणार आहे, असे भीमशक्ती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गोपाळराव तंतरपाळे यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
पद्मश्री दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय शासननिर्णयानुसार रायगड जिल्ह्यामध्ये महाड, पोलादपूर येथील अनेक शेतजमीन प्रकरणे प्रलंबित आहे. अन्य जिल्ह्यांतही प्रलंबित प्रकरणे आहेत. त्यामुळे सरकारने ही प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर सोडवून गोरगरीब वंचित घटकाला न्याय द्यावा; अन्यथा महाड येथील सावित्री नदीपात्रात जलसमाधी घेणार, असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यासाठी महाड येथे सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक न्याय व आदिवासी सबलीकरण स्वाभिमान योजनेचे प्रचारक उमेश लांगी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com