चाळीस वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

चाळीस वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

पालघर, ता. १६ (बातमीदार) : केळवे येथील आदर्श विद्या मंदिरातून १९८२ मध्ये शाळेचा निरोप घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या ‘मैत्र’ या समूहाचे स्नेहसंमेलन रविवारी (ता. १२) केळव्यातील एका रिसॉर्टवर आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात वाडा, झाई, बोरिगाव, पुणे, मुंबई इत्यादी दूरवरच्या ठिकाणांहून विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पुनर्भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता.
मनीश राऊत यांनी प्रास्ताविक केले. नंतर सर्वांनी आपल्या दिवंगत मित्रांसह आपल्या लाडक्या शिक्षिका करुणा म्हात्रे व सेवक भालचंद्र पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी प्रत्येकाने आपला परिचय करून दिला. अंजली गोरे, अजय वर्तक, किशोर किणी, किशोर चौधरी, जगदीश घरत, कल्पना म्हात्रे, राजेंद्र येवले, मुसर्रत शेखला, उज्ज्वला तरे, भारती जोशी, मंगला वर्तक व नेत्रा सावे, राजेंद्र सावे आदींनी मनोगत व्यक्त केले. अंजली गोरे, नेत्रा सावे यांनी सुरेल आवाजात प्रार्थना गायली. ज्या शाळेने आपणाला आपली अशी ओळख मिळवून दिली, त्या शाळेला यथाशक्ती आर्थिक साह्य करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. संमेलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून आणि दर वर्षी असेच एकत्र येण्याचा संकल्प करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com