अर्थसहाय्यापेक्षा आधाराची गरज!

अर्थसहाय्यापेक्षा आधाराची गरज!

मुंबई, ता. १८ : महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. येथील शेतकऱ्यांना योजनेच्या पैशांऐवजी आधाराची आणि मदतीची गरज असते; मात्र आकड्यांकडे पाहता या क्षेत्रासाठीची तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. राज्य सरकारने कृषी, आरोग्य खात्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली तरतूद आणि पोलिस खात्यासाठी केलेली तरतूद यात मोठी तफावत आहे. त्यामुळे राज्य सरकारने महत्त्वाच्या खात्यांसाठी निधीची तरतूद करताना समतोल राखणे गरजेचे असल्याचे मत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत आमदार तांबे यांनी सहभाग घेत वरील मुद्दे मांडले. ते पुढे म्हणाले, की अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठीची तरतूद १७ टक्क्यांनी कमी दाखवण्यात आली आहे. पोलिस खात्यासाठीच्या तरतुदीमध्ये २६ टक्क्यांची वाढ प्रस्तावित आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्यास हा खर्च कमी होऊ शकतो. एकीकडे आरोग्याचे, कृषीचे बजेट कमी केले आणि पोलिस खात्याचे बजेट वाढवले, याबाबत सरकारने विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com