मिरा-भाईंदरमध्ये काँग्रेसचे हाथ से हाथ जोडो अभियान

मिरा-भाईंदरमध्ये काँग्रेसचे हाथ से हाथ जोडो अभियान

भाईंदर, ता.२० (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाला सुरुवात झाली आहे. माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली मिरा-भाईंदर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रत्येक ब्लॉकमध्ये रॅली काढण्यात येत आहेत.
गेल्या आठ वर्षातील मोदी सरकारच्या राजवटीत महागाईने उच्चांक गाठला आहे, बेरोजगारी वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर जीएसटी लावून महाग केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, महिला आदींसह सर्व घटक भाजपच्या कारभारावर नाराज असल्याने काँग्रेसने राज्यपातळीवर ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केले आहे. भाजपचे नेते दोन उद्योगपतींसाठी देश चालवित असून गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वीपणे पार पडल्यानंतर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पक्ष प्रवक्ते व प्रदेश प्रतिनिधी प्रकाश नागणे यांनी दिली.
हे अभियान दोन महिने चालणार आहे. राज्य निरीक्षक व प्रदेश सरचिटणीस भावना जैन, आनंद सिंह, माजी उपमहापौर सय्यद नूरजहाँ हुसैन यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, महिला, युवक काँग्रेसचे पदाधिकारी पदयात्रेत सहभाग घेत आहेत. उत्तन, भाईंदर पश्चिम, पूर्व, नया नगर, शांती नगर, हटकेश, मीरा रोड, काशीमिरा आदी आठ ब्लॉक मधील विविध भागात २४ प्रचार फेरी व चौकसभा घेऊन काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक पायी फिरून पत्रके वाटून जनतेशी थेट संवाद साधत असून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नागणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com