वाड्यात अवकाळीने भाजीपाल्याचे नुकसान

वाड्यात अवकाळीने भाजीपाल्याचे नुकसान

वाडा, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील सर्वच भागांत मंगळवारी (ता. २१) पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या भाजीपाला, टोमॅटो व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. टोमॅटो लागवड क्षेत्रात संपूर्ण पाणीच पाणी झाल्याने विक्रीस तयार असलेले टोमॅटो खराब झाले आहेत. लागवडीवर केलेला खर्च वाया गेला आहे; तर वीटभट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तालुक्यातील चंद्रपाडा (कोंढले) येथील काशिनाथ पाटील या शेतकऱ्याने सहा एकर जमिनीवर चार लाख रुपये खर्च करून टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाची अवकाळी पावसाने अक्षरश: नासाडी करून टाकली आहे. यात त्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असून केलेला खर्च पाण्यात गेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीकरिता राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी काही दिवस संपावर गेले होते. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास मोठा विलंब झाला आहे. आता संप मिटला असून तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com