अठरा वर्षाच्या आत मुलींचे लग्न नाही

अठरा वर्षाच्या आत मुलींचे लग्न नाही

विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) : पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेला ‘जनसंवाद अभियान’ कार्यक्रम विक्रमगड तालुक्यातील खुडेद (बिलाल पाडा) व विजयनगर येथे उत्साहात पार पडला. खुडेद गावात पार पडलेल्या कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या मुलींचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न करू, अशी शपथ घेतली.
जनसंवाद अभियानाचा चांगला परिणाम संपूर्ण पालघर जिल्ह्यात जाणवू लागला आहे. विक्रमगड पोलिस ठणे कार्यक्षेत्रात असलेल्या खुडेद गावाच्या हद्दीतील बिलाल पाडा व विजयनगर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात येथील नागरिकांना विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांनी जनसंवाद अभियानांतर्गत अल्पवयीन मुलीचे लग्न न करणे व त्याचे दुष्परिणाम याविषयी प्रबोधन केले. त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व पालकांनी ‘आम्ही सर्व ग्रामस्थ हे गावातील मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणार नाही. तसेच मुलींचे शिक्षण पूर्ण करून तिला तिच्या पायावर उभी राहण्यासाठी सक्षम करू’, अशी शपथ घेतली. महिला पोलिस अंमलदार लोखंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पालघर जिल्ह्यातील मुली या काटक असून त्यांनी पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करावे. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com