ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांची पुनर्बांधणी

ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांची पुनर्बांधणी

मुंबई, ता. २४ ः पावसाचे पाणी सहजपणे वाहून जाण्यासाठी ब्रिटिशांनी मुंबईत नियोजनबद्ध पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे तयार केले होते. या जलवाहिन्या आता जीर्ण झाल्याने त्यांची पुनर्बांधणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने दिली. ही कामे पूर्ण होताच पावसाचे पाणी भरण्याची शहर भागातील ठिकाणे कमी होतील, असा विश्वास या विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत.
शहर भागातील ३२ किलोमीटर लांबीच्या कमानीच्या आकाराच्या पर्जन्य वाहिन्यांचे पालिकेने मूल्यांकन केले आहे. त्यापैकी सुमारे १४.२८ किलोमीटर लांबीच्या २७ कमानी वाहिन्या नव्याने टाकण्यात येणार आहेत. तसेच ८०० किलोमीटर लांबीच्या तीन कमानींची पुनर्बांधणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागाने दिली.
जमिनीखालील या जलवाहिन्यांची पडझड झाल्याने त्यातून पावसाळी पाण्याचा निचरा होण्यात अडथळे येत आहेत. परिणामी पावसाळ्यात शहराच्या काही भागात पाणी तुंबत होते. आगामी पावसाळा तीन महिन्यांवर आला असल्याने जमिनीखालील या वाहिन्या बदलण्याच्या कामाला पावसाळ्यानंतर वेग येईल. ही कामे पूर्ण होताच पावसाचे पाणी भरण्याची ठिकाणेही कमी होतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com