शेतकरी प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित

शेतकरी प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित

बोर्डी, ता. २६ (बातमीदार) : नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्साहन भत्ता मिळाला नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. रब्बी हंगामासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत शेतकरी पडले आहेत. बोर्डी परिसरातील चार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधून शेकडो शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते; मात्र वेळोवेळी उद्भवलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादनात मोठा फटका बसला होता. अशा परिस्थितीत घेतलेली कर्जाऊ रकमेची परतफेड करणे शेतकऱ्याला कठीण झाले असतानादेखील शेतकऱ्यांनी मुदतपूर्व परतफेड कर्जाचा बोजा कमी केला होता. अनेक शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने अशा दुर्बल शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती; परंतु ज्या शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीतही कर्जाची नियमित परतफेड केली त्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली होती. मात्र नवीन सरकार आल्यानंतर या शेतकऱ्यांना तातडीने प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल, अशी ग्वाही दिल्यानंतर मागच्या तीन महिन्यापासून शेतकरी भत्त्यापासून प्रतीक्षेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com