खजूर-फळांचे भाव वधारले

खजूर-फळांचे भाव वधारले

रोहा, ता. २७ (बातमीदार) : शुक्रवारपासून रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे. या पवित्र महिन्यात फळांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. मात्र, यंदा फळांच्या भावात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. रोहा शहरात कलमी खजूर ८०० रुपये किलो, तर साधा खजूर २०० रुपये किलोने विकला जात आहे.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव व भगिनी महिनाभर उपवास पाळतात. पहाटे सूर्योदयापूर्वी उपवास (सहेरी), तर सायंकाळी सूर्य मावळण्यानंतर मगरीबची आजान (बांग) झाल्यानंतर रोजा इफ्तार केला जातो. हा रोजा इफ्तार करताना खजूर, केळी, अननस, कलिंगड, संत्री, मोसंबी, सफरचंद, चिकू इत्यादी फळांसह घरगुती खाद्यपदार्थांची मेजवानी असते. सध्या रोहा शहरात पाच ते सहा ठिकाणी फळांची दुकाने आहेत. मात्र, दुकानांत खजूरसह फळांच्या किमती वधारल्याने आहेत. सर्वांत चविष्ट असलेल्या कलमी खजूरचे भाव किलोमागे १०० ने वाढले असून ८०० रुपयांनी विकला जातो. तर साधा खजूर २०० रुपये किलोने विक्री होत आहे. त्यातच अननसचा भावातही नगामागे ३० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या अननस ९० रुपये नग आहे. सफरचंदचे भाव गतवर्षी १४० किलो, तर यंदा १६० रुपयांनी विकले जात आहेत. गत वर्षी २५ रुपये किलोने मिळणारे कलिंगड या वर्षी ३५ रुपयांनी मिळत आहेत. ऐन रमजान महिन्यात फळांचे भाव वाढल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

फळांचे वाढलेले दर (किलोमध्ये, रुपयांत)
गत वर्षी यंदा
कलमी खजूर ७०० ८००
अननस (नग) ६० ९०
सफरचंद १४० १६०
कलिंगड २५ ३५

रोहा : पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने फळांची खरेदी करताना ग्राहक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com