मुंबईच्या पाण्याची नासाडी थांबेना

मुंबईच्या पाण्याची नासाडी थांबेना

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ ः मुंबईला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटून २०१५ मध्ये वागळे इस्टेटमधील झोपडपट्टीमध्ये जलप्रलय आला होता. आता पुन्हा त्याच ठिकाणी बोअरवेल खोदताना पडलेल्या भगदाडामुळे गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईकरांच्या लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर वागळेत पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती घडण्याची भीती आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्ती केली आहे.

मुंबईची तहान भागवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून जलबोगद्याद्वारे पाणी भांडुप येथील जल शुद्धीकरण प्रकल्पात नेले जाते. मात्र जलशुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत जल बोगद्याला ठाण्याच्या वागळे येथील किसन नगर भागात बोअरवेलसाठीचे खोदकाम करताना नोव्हेंबर महिन्यात हानी झालेली आहे. मागील पाच महिन्यांपासून या ठिकाणी दररोज अंदाजे पाच ते सहा दशलक्ष लिटर पाणी वाया जात आहे. यावर उपाय म्हणून सक्शन पम्पद्वारे हे पाणी गटारात व नाल्यात सोडले जात असल्याने मुंबईकरांच्या हक्काच्या दीडशे लाख लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा उचलून धरला होता. आता यामध्ये आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे.

---
जकातनाका येथे तळे साचले
तलावांचे शहर अशी ठाण्याची ओळख असली, तरी जलवाहिनी फुटण्याच्या प्रकारात वाढ होत असल्यामुळे तळे साचत असल्याचे दिसत आहे. आनंदनगर जकात नाका येथे सोमवारी जलवाहिनी फुटल्याने तळे साचले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com