वसईत काँग्रेसचे ‘जय भारत सत्याग्रह’ आंदोलन

वसईत काँग्रेसचे ‘जय भारत सत्याग्रह’ आंदोलन

विरार, ता. १९ (बातमीदार) : वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने १५ ते २५ एप्रिल या कालावधीत ‘जय भारत सत्याग्रह’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी सांगितले. वसई जिल्हा काँग्रेसने जय भारत सत्याग्रह आंदोलनाची घोषणा करून आंदोलनाला प्रारंभ केला आहे.
‘जय भारत सत्याग्रह’ आंदोलनाद्वारे जिल्हा काँग्रेसच्या वतीने वसई विरार महानगरात विविध ठिकाणी गल्ली, नाका, चौकसभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. ओनिल आल्मेडा म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार हे जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले आहे. महागाई कमी करणे व दोन कोटी रोजगार देणे ही आश्वासने फोल ठरली आहेत. इंधनाचा दर कमी करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com