खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण

खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण

जव्हार, ता. २६ (बातमीदार) : जव्हार शहरात भर उन्हातच महावितरण कंपनीचा विद्युत पुरवठा हा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित होत असल्याने नागरिकांता संताप व्यक्त होत आहे. भर उन्हात अचानक वीज गेल्याने पंखा व एसी बंद पडून अंगाची लाहीलाही होत असल्याने सर्वसामान्यांसह वृद्ध, लहान बालके, आजारी व्यक्ती त्रस्त झाले आहेत.
जव्हारला होणारा विद्युत पुरवठा हा साधारण ८० ते ९० किलोमीटर अंतराहून होत आहे. अनेक वळणे, डोंगरदऱ्या, घनदाट जंगले यामुळे कोणत्याही कारणास्तव एखादी वायर तुटणे किंवा खां पडला तरी विद्युत पुरवठा खंडित होत असतो. यात नागरिकांची कोणत्याही प्रकारे चूक नसताना वीज देयक नियमित वेळेत भरल्यानंतरही त्यांना विजेच्या उपभोगापासून वंचित राहावे लागते. याला जबाबदार कोण? असा सवाल केला जात आहे.

------------
आम्ही पहाटेपासून उठून कामाला लागत असतो. दुपारी आरामाला काही वेळ मिळतो. त्यात देखील अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुले पंखे बंद होऊन त्रास सहन करावा लागतो. बऱ्याचदा पहाटे, रात्री, सायंकाळी केव्हाही लाईट जाते.
- सुरेखा पाटील, गृहिणी

-------------------
जव्हारला होणारा विद्युतपुरवठा हा डहाणू येथून होत असतो. विद्युतपुरवठा होत असताना लांब अंतर असल्याने अनेकदा खांब पडणे, वायर तुटणे यासारखे प्रकार घडत असतात. त्यामुळे दुरुस्तीसाठी तेथून विद्युतपुरवठा बंद करण्यात येत असतो. जव्हार येथून विद्युत पुरवठा बंद केला जात नाही.
- विवेक तळणीकर, उपअभियंता, महावितरण, जव्हार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com