तळोजा एमआयडीसीतील दुर्गंधीची पर्यावरण मंत्रालयाकडून दखल

तळोजा एमआयडीसीतील दुर्गंधीची पर्यावरण मंत्रालयाकडून दखल

खारघर, ता. २६ (बातमीदार) : तळोजा एमआयडीसीमधून परिसरातील वसाहतीत केमिकलयुक्त दुर्गंधी येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करून अहवाल सादर करण्यात यावा, असे पत्र भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांना पाठवण्यात आले आहे.

तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्री सोडण्यात येणाऱ्या केमिकलच्या उग्र वासामुळे तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि जवळपास असलेल्या गावातील नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान, भारतीय राष्ट्रीय परिवर्तन पार्टीचे पदाधिकारी राजीव सिन्हा यांनी पर्यावरण मंत्रालयाकडे रामकी परिसरातील उग्र वासामुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार केली होती. सदर तक्रारीची दखल घेत भारत सरकार पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. सोनू सिंग यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली यांना पत्र पाठवले आहे. तळोजा एमआयडीसीमधून केमिकलयुक्त दुर्गंधीसंदर्भात योग्य कार्यवाही करून अहवाल पाठवावे, असे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com