आणखी २६ स्पेशल गाड्या धावणार

आणखी २६ स्पेशल गाड्या धावणार

रोहा, ता. ५ (बातमीदार) : उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आणखी २६ उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शनिवार, सोमवार आणि बुधवारी धावणार आहेत. त्यांचे आरक्षण गुरुवार (ता. ४) पासून सुरू झाले आहे.
मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीच्या अनुषंगाने देशभरात सुमारे ९१९ गाड्या सोडल्या आहेत. त्यापैकी अर्ध्याहून अधिक गाड्यांची बिहार आणि उत्तर प्रदेशसाठी धावाधाव सुरू असून कोकणवासीयांसाठी केवळ ७४ गाड्या सुटणार असल्याचे समजताच कोकणवासीयांत संतापाची लाट पसरली होती. समाज माध्यमांत व वर्तमानपत्रात टिकेची झोड उठताच खडबडून जागे झालेल्या मध्ये रेल्वेने उशिरा का होईना आणखी २६ गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उशिरा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार असून परतीच्या प्रवासादरम्यान मोठी सोय होणार आहे.

--------------
रोहा, माणगावलाही थांबा
०११२९ ही विशेष गाडी ६ मेपासून ३ जूनपर्यंत दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटणार आहे; तर ०११३० ही विशेष गाडी ७ मे पासून ४ जूनपर्यंत दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी थिविम येथून १६.४० वाजता मुंबईसाठी सुटणार आहे. या दोन्ही गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबा असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com