भिवंडी महापालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय

भिवंडी महापालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय

भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून सद्यस्थितीत ४९ शाळांपैकी २५ शाळा धोकादायक स्थितीत आहेत. यापैकी अतिधोकादायक दोन शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ११ माध्यमिक शाळा असून महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सध्याच्या घडीला एकूण २८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच शिक्षणाधिकारी नसल्याने सातत्याने पदभार हा उपायुक्त दर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दिला जात आहे. त्यामुळे २८ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
भिवंडी महापालिकेच्या इयत्ता सातवी ते दहावीमध्ये विद्यार्थीगळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना गणवेश दिला जातो; परंतु विद्यार्थ्यांना गणवेश दिला जात नाही. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची सुविधा देण्यात येत नाही. तसेच शाळांमध्ये मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार रईस शेख यांनी या सर्व बाबींचा अभ्यास केला असता शहरामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षणतज्ज्ञ मंडळींसमवेत एका समितीची निर्मिती केली आहे. त्या माध्यमातून इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन, शैक्षणिक उपक्रम, शिकवणीबाबत समिती प्रयत्नशील आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या धर्तीवर भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक असावेत, यासाठी पाठपुरावा करीत आहे, अशी माहिती आमदार राईस शेख यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com