ठाण्यात आगडोंब; ३७६ आगीच्या घटना

ठाण्यात आगडोंब; ३७६ आगीच्या घटना

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ठाणे महापलिका हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने या आगीच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तर दुसरीकडे वित्तहानी झाल्याचे दिसून येत आहे. त्यात जानेवारी ते मे या १२० दिवसांच्या कालावधीत पालिका हद्दीत आगीच्या ३७६ घटना घडल्या आहेत. त्यामुळे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची दमछाक होताना दिसत आहे. मागील सहा दिवसांत आगीच्या १२ घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे शहराचे झपाट्याने होणारे नागरीकरण, उभे राहणाऱ्या उंच टोलेजंग इमारती, त्याच्याच जोडीला बिझनेस हब, आयटी पार्क यांमुळे शहरावर ताण वाढत आहे. त्यातून विजेचा होणारा अतिरिक्त वापर, वातावरणातील झालेले बदल यांमुळे उष्णतेचे वाढते प्रमाण यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच मे महिन्यात अवघ्या सहा दिवसांत आगीच्या १२ घटना घडल्या आहेत. आग लागण्याच्या प्रमुख कारणांमध्ये वातानुकूलित यंत्रणा वेळच्या वेळी निगा देखभाल न करणे, विजेच्या उपकरणांची तपासणी योग्य वेळेत न करणे यामुळे आगीच्या घटना घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वेळच्या वेळी सर्व्हिसिंग आणि विजेची उपकरणे दुरुस्त करणे गरजेचे आहे.

....................................
ठाण्यातील आगीच्या घटना
जानेवारी - ६७
फेब्रुवारी - ११५
मार्च - ९५
एप्रिल - ८७
मे (५ मेपर्यंत) - १२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com