मागील पाच दिवसांत २०० रिक्षा चालकांवर कारवाई

मागील पाच दिवसांत २०० रिक्षा चालकांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबई वाहतूक पोलिसांकडून मागील पाच दिवसांत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०० हून अधिक रिक्षा चालकांवर कारवाई केली. वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर रिक्षाचालकांबाबत वारंवार अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी १ ते ५ मेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २५७ रिक्षाचालकांवर कारवाई केली. बोरिवली आणि वांद्रे येथे मोठ्या संख्येने कारवाई करण्यात आली.
बोरिवलीमध्ये २२१ चालकांना विशेषत: रेल्वे स्थानक परिसराबाहेर दंड ठोठावण्यात आला. भाडे नाकारल्याबद्दल १७०, अतिरिक्त प्रवासी घेऊन जाण्यासाठी तीन, चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याबद्दल नऊ, नो-पार्किंग झोनमध्ये पार्किंग केल्याबद्दल सहा, परवान्याशिवाय वाहन चालवल्याबद्दल एक आणि इतर उल्लंघनांसाठी ३२ रिक्षा चालकांना दंड करण्यात आला. त्याचप्रमाणे वांद्रे रेल्वे स्थानक परिसराबाहेर वाहतूक पोलिसांनी ऑटो स्टँडबाहेर पार्किंग केल्याबद्दल सात ऑटोचालकांना, ‘नो-एण्ट्री’ झोनमध्ये प्रवेश केल्याबद्दल १६, नो-पार्किंग झोनमध्ये पार्किंग केल्याबद्दल चार आणि भाडे नाकारल्याबद्दल नऊ वाहनचालकांना दंड केला. १ एप्रिल ते ४ मेदरम्यान व्ही. पी. रोड गिरगाव येथे ऑपेरा जंक्शन ते अलंकार हाऊसपर्यंत १,३५७ वाहनांना दंड ठोठावण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे वाहतूक पोलिसांनी प्रथमच ही आकडेवारी ट्विटरवर दिली आहे. नागरिकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देण्यासाठी हे करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com