पाणी पुरवठा योजनांसाठी मुख्य सचिवांना पत्र

पाणी पुरवठा योजनांसाठी मुख्य सचिवांना पत्र

कासा, ता. ८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याला नैसर्गिक, भौगोलिक कारणांमुळे पाण्याचे मुबलक स्रोत आहेत. जिल्ह्याबाहेरील शहरांनासुद्धा पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे; मात्र नियोजन, व्यवस्थापनाच्या ढिसाळपणामुळे जिल्ह्यातील पाणी जवळच्या गाव-पाडे, लहान-मोठ्या शहरांना मिळणे दुरापास्त झाले आहे. याप्रकरणी राज्य स्तरावरून उपाययोजना करण्यासाठी सोसायटी फॉर फास्ट जस्टिस, डहाणू या संस्थेने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवत समस्यांचे गाऱ्हाणे मांडले आहे. पालघर जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना रखडलेल्या असल्याने आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. याप्रकरणी संबंधितांकडे समस्या मांडूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. जिल्ह्यात राबवल्या जात असलेल्या, सर्व पाणीपुरवठा योजनांची माहिती संबंधितांकडून घेण्यासाठी बैठक बोलवावी, असे सोसायटी फॉर फास्ट जस्टिस- डहाणू या संस्थेने पत्रात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com