नालेसफाईअभावी यंदाही मुंबई तुंबणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नालेसफाईअभावी यंदाही मुंबई तुंबणार!
नालेसफाईअभावी यंदाही मुंबई तुंबणार!

नालेसफाईअभावी यंदाही मुंबई तुंबणार!

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : कंत्राटदार व महापालिकेचे काही अधिकारी यांच्या निष्काळजीमुळे नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात मुंबई तुंबेल, असा दावा माजी मंत्री व काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी आज नाले पहाणी दौऱ्यादरम्यान केला. साफसफाईच्या नावाखाली नालेसफाईच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नसीम खान यांनी केला.

मिठी नदीची व्यवस्थित सफाई न केल्याचे नसीम खान यांनी सांगितले. अनेक नाल्यांमध्ये सहा फूट गाळ असूनही फक्त वरवरचा एक फूट गाळ काढला जातो. अनेक ठिकाणी लहान नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे. क्रांतीनगर-बैल बाजार परिसरात सहार विमानतळाच्या भिंतीजवळील मिठीनदीमधील गाळ खालपर्यंत काढलेला नाही. तसेच मुंबईत ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले असून तेथे अत्यंत मंदगतीने काम सुरू आहे. त्यामुळे जूनच्या सुरुवातीला जोराचा पाऊस आल्यास मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबेल, अशीही भीती खान यांनी व्यक्त केली.

खान यांनी या विषयावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना ट्विट करून नालेसफाई वेगाने आणि व्यवस्थित व्हावी अशी मागणी केली आहे. या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी तसेच मुंबईतील रस्त्यांची कामे त्वरेने पूर्ण करावीत, अशा मागण्याही खान यांनी केल्या आहेत.